राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांचे गावकऱ्यांनी केले स्वागत

राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांचे गावकऱ्यांनी केले स्वागत
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांचे गावकऱ्यांनी केले स्वागत

नगर : ‘‘ग्रामस्थांच्या रेट्यापुढे, तसेच देशभरातील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला जनतेच्या दबावापुढे झुकावे लागले. या आंदोलनामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळाला तर देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, मात्र त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल,’’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. दिल्लीत सात दिवस उपोषण केल्यानंतर अण्णा हजारे यांचे शनिवारी (ता. ३१) राळेगणसिद्धी (ता. नगर) येथे आगमन झाले. ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत गेले. महिलांनी फुलांची उधळण करत अण्णांचे औक्षण केले. गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी प्रथम येथील यादवबाबांचे दर्शन घेतले व नंतरच त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. हजारे म्हणाले, ‘‘आंदोलनातील निर्णयाचा लाभ सबंध देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. माझ्या आंदोलनाच्या काळात ग्रामस्थांनी सलग सात दिवस गावात विविध प्रकारची आंदोलने केली, त्यामुळे सरकार झुकले आहे. एका गावाची शक्ती किती अफाट असते, ते या आंदोलनातून समाजाला दिसून आले आहे. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या आहेत, तसे लेखी पत्र पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्र्यांनी दिले आहे.’’ ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन हजारे यांचे स्वागत व अभिनंदन करत पेढे वाटले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com