सोयाबीन, कापूस पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या ः तुपकर

रविकांत तुपकर
रविकांत तुपकर

बुलडाणा  : वारंवार संकटांमुळे मागील दोन वर्षांपासून शेतकरी हवालदिल झाला आहे. बोंड अळीने कापूस उद्‌ध्वस्त झाला, खोड किडीने सोयाबीनचे नुकसान झाले. पावसाने दडी मारल्याने आता सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन होण्याची शक्यता नाही. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी सरकारने सोयाबीन, कापूस पिकांचे पंचनामे करून १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली.

जिल्ह्यातील पातुर्डा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. तुपकर बोलत होते. या वेळी ‘स्वाभिमानी’चे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, रोशन देशमुख, नितीन पाचपोर, निरोडचे सरपंच राजू देशमुख, उज्ज्वल चोपडे, अनंता मानकर, योगेश मुरूख, नीलेश खुपसे, विलास तराळे, संतोष तायडे, संतोष गारकर, समाधान झाडोकार आदी उपस्थित होते.

श्री. तुपकर म्हणाले, की मागील चार वर्षांत केवळ आश्वासनाशिवाय सरकारने काहीच केले नाही. मोदी सरकारने सोयाबीन व कापसाला दिलेला हमीभाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. सोयाबीनला एक क्विंटलमागे साडेतीन हजार रुपये उत्पादन खर्च येतो. कापसाला चार हजार रुपयांवर क्विंटलमागे खर्च येतो. मात्र, सरकारने जाहीर केलेले हमीभाव यापेक्षा कमी आहेत. यामुळे आता सोयाबीन व कापूस प्रश्नावर विदर्भात तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com