कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय कायमस्वरूपी असावा ः अनिल घनवट

कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय कायमस्वरूपी असावा ः अनिल घनवट
कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय कायमस्वरूपी असावा ः अनिल घनवट

नगर ः केंद्र शासनाचा कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय चांगला आहे. हा निर्णय कायमस्वरूपी असावा. त्यातूनच शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले. घनवट यांनी सांगितले, की केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवून अघोषित निर्यातबंदी उठविली आहे. शासनाचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. निर्यात खुली होताच कांद्याचे गडगडणारे दर तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलने वाढले. त्यामुळे कायमस्वरूपी शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर शासनाने हा निर्णय कायमस्वरूपी अमलात आणणे गरजेचे आहे. याआगोदर शासनाने अचानक निर्यातबंदी लावून किंवा निर्यातमूल्य वाढवून आंतरराष्ट्रीय कांदा व्यापारात हस्तक्षेप केला होता. त्यामुळे भारताने अांतरराष्ट्रीय बाजारातील आपली विश्वासाहर्ता गमावली होती. ती पुन्हा कमविण्यासाठी कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायमस्वरूपी थांबला पाहिजे. ग्राहकहितासाठी व शहरी मतदानावर डोळा ठेवून शेतीमाल स्वस्त ठेवण्याचा सर्वच सरकारांचा प्रयत्न असतो; पण त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. कांद्याला किमान वीस रुपये प्रतिकिलो विकला तरच शेतकऱ्यांना परवडते. शासनाने पुन्हा निर्यातबंदी लागू केल्यास किंवा किमान निर्यातमूल्य लादण्याचा प्रयत्न केल्यास त्याचदिवशी शेतकरी पुन्हा रस्त्यावर येतील. बाहेरील देशात भारतापेक्षा स्वस्त कांदा मिळाला तर दहा टक्के आयातकर लावून आयात करायलाही हरकत नाही; पण चढ्या दराने आयात करून शहरातल्या ग्राहकांना स्वस्तात विकण्याचा धंदा शासनाने बंद करावा, असे घनवट म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com