परतीचा पाऊस सोयाबीनच्या मुळावर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : पावसाच्या दीर्घ खंडामुळे झालेली फुलगळ, त्यानंतर किडीचा हल्ला यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. दाण्याचा आकार लहान झाला असून, यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. त्यात परतीच्या पावसामुळे काढणीस आलेल्या तसेच कापणी सुरू असलेल्या सोयाबीन पिकांचे भिजून नुकसान होत आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाही ऐन काढणीच्या वेळी पाऊस सुरू झाल्यामुळे हाती आलेला घास हिरावण्याची शक्यता दिसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोमवारी (ता.२) सकाळी परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे कापणी केलेले सोयाबीन पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पेरणीनंतर ४० ते ५० दिवस पावसाचा खंड पडला. दीर्घ खंडामुळे पाण्याचा ताण बसलेले वाढीच्या अवस्थेतील पीक उन्हामुळे होरपळून गेले.

त्यानंतर आलेल्या पावसामुळे पिकास जीवनदान मिळाले; परंतु मोठ्या प्रमाणावर फुलगळ झाली. त्यामुळे अनेक भागांतील सोयाबीन पिकास शेंगा लागल्या नाहीत. काही भागात लागलेल्या शेंगा किडी, उंदिरांनी फस्त केल्या. दीर्घ खंडानंतर पावसाच्या झडी सुरू झाल्यानंतर पाणथळ जमिनीवरील पिकात पाणी साचून राहिले. तर काही भागात चक्रीभुंगा, खोड माशीने पीक पोखरून नुकसान केले. गतवर्षीप्रमाणेच यंदाही हाती आलेला घास हिरावण्याची शक्यता दिसू लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान पावसाने भिजून डागी झालेल्या मालास आणखी कमी दर मिळतील, असे  शेतकरी नरेश शिंदे  यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com