गावे, वाड्यावस्त्यांना टॅंकरद्वारे नियमित पाणीपुरवठा व्हावा : प्रा. राम शिंदे

जिल्ह्यातील चारा छावण्यांमधील जनावरांची १५ मे पासून संगणकीय पद्धतीने नोंद करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीने छावणीचालकांना अद्यापपर्यंत टँग पुरविलेले नाहीत. जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीला याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात. - प्रा. राम शिंदे, पालकमंत्री
प्रा. राम शिंदे
प्रा. राम शिंदे

नगर  : जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्‍काळी स्थिती जाहीर करण्यात आली आहे. विविध गावे आणि वाड्यावस्त्यांवर टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा. ठरवून दिलेल्या खेपा होतील याकडे यंत्रणांनी लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिल्या.  

जिल्हा परिषदेत सोमवारी (ता. १३) पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी टंचाई आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील या वेळी उपस्थित होते. 

प्रा. शिंदे म्हणाले, की पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉन्फरन्सद्वारे घेतला. त्यानंतर या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, येणाऱ्या अडचणी, गावांची मागणी, विशेषतः चारा छावणी, टँकर्स, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, बुडकी खोदणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण, प्रगतिपथावरील नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे आणि तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे,  मागेल त्याला काम याप्रमाणे रोहयोच्या कामांचे शेल्फ तयार करणे आदी बाबी महत्त्वाच्या आहेत.  

जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. प्रशासनाने यापूर्वीच दुष्काळ निवारण कामे करण्यासाठी आराखडा मंजूर केला आहे. या कृती आराखड्यातील हाती घेण्यात आलेल्या कामांचा तपशीलवार आढावा विविध यंत्रणांकडून त्यांनी घेतला. जिल्ह्यात सध्या बाराशे कामे रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असून बारा हजारांवर मजुरांची या कामांवर उपस्थिती आहे.

सध्या ग्रामपंचायतींमार्फत सुरू असणाऱ्या कामांवर ५ हजार ५४७ मजूर उपस्थिती असून यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांवर ५ हजार ७०९ मजूर उपस्थिती आहे.जिल्ह्यात सध्या ५०३ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून ४९३ चारा छावण्या सुरू आहेत. छावणीचालकांच्या देयकांना जीएसटी लागणार नसल्याचे यापूर्वीच राज्य शासनाने स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.आतापर्यंत २३ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम छावणीचालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून दुष्काळ बाधित शेतकऱ्यांसाठी आलेले ४०० कोटी रुपयांचे अनुदान ६ लाख ३६ हजार ७९० शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com