पावसामुळे पानमळ्यात मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव

पानमळा
पानमळा

सांगली ः सांगली पूर्व भागातील मालगाव, बेडग, नरवाड ही गावे पानमळ्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. हा भाग पानमळ्याचे आगार मानले जाते. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने पानमळ्यात मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच अपेक्षित दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने पानमळ्यांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे. मिरजेचा पूर्व भाग पानमळ्याचे आगार समजला जातो. पानमळ्याच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी पानमळ्याखाली ८०० ते ९०० एकर क्षेत्र होते. आज ही शेती २०० ते २५० एकरांवर आली आहे. गेल्या चार वर्षांत पानाला चांगला भाव मिळत होता. गेल्यावर्षी पानांना एक हजार रुपये प्रतिडागास (एक डाग म्हणजे बारा हजार पाने) असा मिळाला होता. या वर्षी ८०० ते ९०० रुपये प्रतिडाग (एक डाग म्हणजे बारा हजार पाने) मिळत आहे. या भागात तीन कळी, फाफडा, हक्कल प्रकारच्या पानांची लागवड होते. परंतु वाढत्या खर्चामुळे पानमळ्याचे क्षेत्र घटले आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांत या भागात दमदार पाऊस झाला. पानमळ्यात पाणी साठल्याने वेलींना मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे वेलीच्या मुळी नष्ट होऊ लागल्या आहेत. यामुळे आर्थिक फटका बसू लागला आहे. वाढती मजुरी आणि पानमळा वाचविण्यासाठी होणारा खर्चाचा ताळमेळ पान उत्पादक शेतकऱ्यांना घातलाना तारेवरची कसरत करावी लागते आहे. पानखुडणीसाठी जुने जाणते लोक जात आहेत. मात्र, कुशल कारागिरांची संख्या कमी असल्याने मजुरीत वाढ झाली आहे. त्यामुळे पानांची वेळत काढणी होत नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com