उदयपूर, राजस्थान : शेतकरीहितासाठी राज्य सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना बिनव्याजी ७५ हजार कोटींचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी बुधवारी (ता. ८) केले.
कृषी टेक ग्राम कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाल्या, की गेल्या साडेतीन वर्षात सरकारने ५७ हजार कोटी रुपये व्याजमुक्त कर्जाच्या स्वरूपात वितरित केले आहेत. पाच वर्षांत बिनव्याजी कर्जवाटप हे ७५ हजार कोटींपर्यंत पोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. याआधीच्या सरकारने पाच वर्षांच्या काळात केवळ २५ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज वाटप केले होते. राज्यात कृषी पर्यटनाला वाव असून शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, असे स्पष्ट करून त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसह औषधी वनस्पतीचे उत्पादन घेण्याचा सल्ला दिला.
यावेळी कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले, की पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात राजस्थान हे अव्वल राज्यांपैकी एक आहे. राज्य सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्याच्या दिशेने काम करत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.