कोल्हापूर: यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास नियमानुसार मिळणाऱ्या एफआरपी पेक्षा अधिक ३०० रुपये पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवार (ता. ३०) इचलकरंजी येथे केली. रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून ३२ वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले, असेही खोत म्हणाले.
साखरेचे दर चांगले असल्याने यंदा आंदोलनाची वेळच येणार नाही. यामुळे अवास्तव दर न मागता आम्ही व्यवहार्य पहिला हप्ता मागत आहोत. यामुळे हा दर आम्ही मिळवणारच असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्री. खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर नाव न घेता टीका केली. यंदा साखरेचे उत्पादन मागणी पेक्षा कमी होणार आहे. यामुळे यंदा उसाला चांगला पहिला हप्ता मिळणारच आहे. या दरावरच समाधान न मानता सी रंगराजन समितीच्या अहवालानुसार 70:30 फॉर्म्युला साठी लढा उभारला जाईल, असे खोत यांनी सांगितले.
पहिल्यांदा निवेदन देऊन संवाद साधायचा. कारखानदारांनी नाही मानले तर मात्र आंदोलन करण्याचा इशारा खोत यांनी दिला. यावेळी जेष्ठ अभिनेते राहुल सोलापुरकर, आमदार सुरेश हाळवणकर, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, अशोक स्वामी, पुंडलिक जाधव आदी उपस्थित होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, दसरा महोत्सव समिती अध्यक्ष मोहन माने यांनी संयोजन केले.
सदाभाऊ खोत यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.