बोंडअळीग्रस्तांना मदतीसाठी रॅपरची अट रद्द : सदाभाऊ खोत

कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत
कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत

नागपूर ः बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. त्याकरिता पूर्वी फॉर्म जी सोबत जोडाव्या लागणाऱ्या बियाणे पाकिटांची अट रद्द करण्यात आली असून, केवळ पावती आणि पंचनाम्याची प्रक्रिया झालेला शेतकरी मदतीसाठी पात्र राहील, अशी घोषणा कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत केली. विधान परिषद सदस्य अमर पंडित यांनी या संदर्भाने विचारलेल्या लक्ष्यवेधीला त्यांनी उत्तर दिले. खोत म्हणाले, की २००७  मध्ये बिजी-2 तंत्रज्ञान हे गुलाबी बोंडअळीला बळी पडत असल्याचा अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने दिला होता. त्यानतर २०१० पासून हे तंत्रज्ञान प्रतिकारक्षम नसल्याचे पुन्हा संस्थेकडून कळविण्यात आले. परंतु दुर्दैवाने गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासंदर्भाने संशोधन किंवा उपाययोजना या काळात झाल्या नाहीत. बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यात ९९६ बाटी बियाणे कंपन्यांचे वाण तपासण्यात आले. यातील १५१ अप्रमाणीत आढळल्यानंतर  ११०1 कंपन्यांवर कोर्ट केसेस दाखल करण्यात आल्या आहेत, उर्वरित कंपन्यांवरदेखील लवकरच कारवाई होईल. बोंडअळी प्रादुर्भावानंतर ७ डिसेंबर रोजी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले. एनडीआरएफ, बियाणे कंपन्या व राज्य सरकार अशी तीन टप्प्यात कापूस उत्पादकांना मदत दिली जाईल. पीकविमाधारकांना पीकविम्याची मदत देखील जाईल. राज्यात अप्रमाणित बियाणे जप्त करून साठा विक्रीबंद करण्यात आला. या साठ्याची पुढील हंगामात विक्रीची भीती लक्षात घेता हा साठा नष्ट केला जाईल.  केंद्रेकर यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com