SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात युतीला २९ तर आघाडीला १९ जागा

SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात युतीला २९ तर आघाडीला १९ जागा
SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात युतीला २९ तर आघाडीला १९ जागा

- सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात युतीला २९ तर आघाडीला १९ जागा मिळण्याची शक्यता - युतीतील २९ पैकी भाजपला १९ शिवसेनेला १० तर काँग्रेस राष्ट्रवादीला प्रत्येकी ०८ जागा मिळण्याची शक्यता

एक्झिट पोल २०१९ : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला.

मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. त्याप्रमाणे महाराष्ट्राचा अचूक एक्झिट पोल साम वाहिनी देत असून 

सकाळ आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीलाच मिळतील, तर आघाडीनेही जोरदार लढत दिल्याचे चित्र आहे. युतीला २९ आणि आघाडीला १९ जागा मिळण्याचा अंदाज साम वाहिनी आणि सकाळच्या एक्झिट पोलने वर्तविला आहे.

विभागानुसार, पाहिल्यास कोकणात एकूण सहा जागा असून सहापैकी पाच जागांवर शिवसेना ०४, भाजप ०१ तर राष्ट्रवादीला ०१ जागा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे म्हणजेच, कोकणात युती ०५ तर आघाडी ०१ जागेवर विजय मिळवणार असल्याची शक्यता साम आणि सकाळच्या सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे.

मराठवाड्यात एकूण ०८ जागा असून ०८पैकी भाजप ०३, शिवसेना ०२, राष्ट्रवादी ०२ तर काँग्रेस ०१ जागेवर विजयी होईल असे सांगण्यात आले आहे. म्हणजेच मराठवाड्यातील ०५ जागांवर युती तर ०३ जागांवर आघाडीचा विजय होईल, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात एकूण १० जागा असून यापैकी भाजप ०४, शिवसेना ०१, राष्ट्रवादी ०४, तर एका ठिकाणी इतर उमेदवाराला यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सकाळ आणि साम वाहिनीच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी युतीला ०५ जागा तर आघाडीला ०४ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून एका ठिकाणी इतर पक्षाच्या उमेदवाराला यश मिळेल असे सांगण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात एकूण ०८ जागा असून भाजपला ०५, शिवसेनेला ०१, काँग्रेसला ०२ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. म्हणजेच एकूण ०८ पैकी युतीला ०६ तर आघाडीला ०२ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुंबईत एकूण ०६ जागा असून यापैकी भाजपला ०२, शिवसेनेला ०२ आणि राष्ट्रवादीला ०२ जागा मिळतील असा अंदाज आहे. राष्ट्रवादीला मात्र मुंबईत एकाही जागेवर यश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत युती ०६ पैकी ०४ जागा कायम ठेवण्यात यश मिळवेल तर आघाडी ०२ जागांवर यशस्वी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विदर्भात एकूण १० जागा असून १० पैकी भाजप ०४ जागांवर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी ०३ जागांवर यश मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून विदर्भात शिवसेनेला मात्र एकाही जागेवर यश मिळवता येणार नसल्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. विदर्भात १०पैकी ०४ जागांवर युती तर ०६ जागांवर आघाडीचा विजय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com