‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधारा

‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधारा
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधारा

जळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून, हे पाणी शेवटच्या भागात अडवून आपले शिवार व गावातील टंचाई दूर करण्यासंबंधी फुपनगरी (ता. जि. जळगाव) येथील ग्रामस्थांनी वाळूचा बंधारा बांधला आहे.

दिवाळीपूर्वी या कामाची संकल्पना ग्रामस्थांना सूचली. या बंधाऱ्याचा लाभ कानळदा, दोनगाव, वडनगरी व फुपनगरी या गावातील शिवाराला होणार आहे. केळी, कापूस व भाजीपाल्याची शेती या भागात केली जाते. नदीत वाळू उपसा अधिक झाल्याने खोल खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचेल व बंधाऱ्यामुळे पाणी अडून ते किमान जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत आटणार नाही. मागील वर्षीदेखील नदीत पाणी आले होते. परंतु ते वाहून गेले होते. यामुळे मे व जूनमध्ये अनेक कूपनलिकांच्या पाण्याची पातळी कमी झाली होती.

हा बंधारा नदीच्या शेवटच्या भागात आहे. बंधाऱ्यातील अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी आउटलेटही सोडले आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असेल तर बंधाऱ्याला नुकसान न होता पाणी या आऊटलेटमधून निघून जाईल. या कामासाठी सरपंच श्‍यामकांत जाधव, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मंगलसिंग पाटील यांनी पुढाकार घेतला. प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ तथा जळगाव जनता बॅंकेचे उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव यांनीही बंधाऱ्याची पाहणी करून त्यासाठी मदत दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com