‘जागतिक अन्न पुरस्कार विजेत्यांची कर्तृत्वगाथा' या पुस्तकाचे प्रकाशन येथील पत्रकार भवन सभागृहात झाले.
‘जागतिक अन्न पुरस्कार विजेत्यांची कर्तृत्वगाथा' या पुस्तकाचे प्रकाशन येथील पत्रकार भवन सभागृहात झाले.

शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख वाट्याला येईल : संजय धोत्रे

पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी समृद्धीशी जोडली जातात. शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख तुमच्या वाट्याला येईल. त्यामुळेच शेतीसाठी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मानवी इतिहासातील कतृत्व अमुल्य आहे, असे उद्गगार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी काढले.  कृषी व अन्न क्षेत्रातील नोबेल समकक्ष पुरस्कार विजेत्यांच्या कतृत्वाविषयी माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर यांनी लिहिलेल्या ''जागतिक अन्न पुरस्कार विजेत्यांची कतृत्वगाथा'' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सकाळ प्रकाशनाने आयोजिलेल्या या सोहळ्यात व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, गुजरात कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू एम.सी. वार्ष्णेय, ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, सकाळ प्रकाशनचे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर होते.  खा. धोत्रे म्हणाले की, सकाळ माध्यम समूहाकडून समाजाच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आघाडीचे काम होते आहे. या कामात कमालीचे परफेक्शन असल्याने सामाजिक कामांचा आदर्श वस्तुपाठ समोर ठेवला जात आहे. सकाळ किंवा अॅग्रोवनच्या माध्यमातून सुशासन, सकारात्मक विचार तसेच शेतकरी गाथांची उत्तम मांडणी होते आहे.  माजी कुलगुरू डॉ. साळवी म्हणाले की, जगाच्या कृषी संशोधनात यातनामय वाटचाल करून काही संशोधकांनी अमूल्य काम केले आहे. त्यात डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचाही समावेश होतो. जागतिक कीर्तीच्या कृषी शास्त्रज्ञांचे कार्य मानवजातीला स्फूर्ती देणारे ठरले आहे. ‘‘व्हॉटसअप आणि फेसबुकच्या युगात नवी पिढी वाचनापासून दूर जात असताना जागतिक अन्नदिनाचे औचित्य साधत जागतिक शेतीच्या इतिहासातील महापुरुषांना पुस्तकरूपाने लोकांसमोर सकाळने आणले आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती आणि शेतीमधील समस्यांच्या जंजाळातून मार्ग काढून मजूर टंचाईच्या समस्यांवर उपाय शोधणाऱ्या शेतकऱ्यांची गाथा सांगणारा ‘अॅग्रोवन’चा दिवाळी अंकदेखील वाचकांच्या भेटीला येतो आहे,’’ असे अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी या वेळी नमूद केले.  लेखक डॉ. नेरकर म्हणाले की, जागतिक कृषी व अन्न क्षेत्रातील नोबेल समकक्ष पुरस्कार मिळवणाऱ्या ४८ शास्त्रज्ञांचा आढावा मी लेखनातून घेतला आहे. यात डॉ. स्वामिनाथन, डॉ. वर्गीस कुरियन, गुरूदेवसिंह खुस, बद्रिनारायण बारवाले, सुरिंदरकुमार वासन, एस. व्ही. गुप्ता, संजय राजाराम अशा सात भारतीय शास्त्रज्ञांनी देखील जागतिक अन्न पुरस्कार मिळवल्याचा आम्हाला सतत अभिमान वाटतो. प्रकाशनाला कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ तसेच शेती क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com