अमरावतीत बियाण्यांची जादा दराने विक्री

अमरावतीत बियाण्यांची जादा दराने विक्री
अमरावतीत बियाण्यांची जादा दराने विक्री

अमरावती  ः जिल्ह्यात एका कंपनीच्या कापूस वाणाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत जादा दराने बियाणे विक्री होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेत संबंधित कंपनीने अमरावती जिल्ह्यात किती पाकिटांचा पुरवठा केला, याची विचारणा कृषी आयुक्‍तालय स्तरावरून करण्यात आली.  जिल्ह्यात औरंगाबाद येथील एका बियाणे कंपनीच्या बीजी-२ कापूस बियाण्यांना अधिक मागणी असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या कंपनीच्या बियाण्यांचा जिल्हाभरात तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याचे दाखविण्याकरिता हा प्रकार करण्यात आला. शेतकऱ्यांमध्येदेखील या बियाण्यांचा तुटवडा असल्याची चर्चा रंगल्याने वाणाला वाढती मागणी आहे. त्याची दखल घेत जिल्ह्यात काही कृषी सेवा केंद्रामधून संबंधित कंपनीच्या बियाण्यांची जादा दराने विक्रीचे प्रकार घडत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी थेट कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे तक्रार केली. कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी याची दखल घेत कृषी आयुक्‍तालय स्तरावर या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले. अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना नियोजनाप्रमाणे बियाणे कंपन्यांनी पुरवठा केला किंवा नाही याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कंपनीला त्यांनी अमरावती जिल्ह्यात किती बियाणे पाकिटे पुरवठा केली, याचा अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com