बँकांसाठी ८० हजार कोटी आहेत, पण शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत

शरद पवार
शरद पवार

सोलापूर : कर्जमाफीमुळे पोटात दुखतं, मग बँकांना ८० हजार कोटी कसे दिले? सरकारकडे शेतकऱ्यांच्या सोसायटीचे पैसे भरायला पैसे नाहीत आणि बँकांची तूट भरायला पैसे कुठून आले, असा प्रश्न उपस्थित करत, कितीही पोटात दुखले तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सुनावले.  अकलूज येथील रत्नाई महिला वसतिगृहाचे उद् घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री, खासदार विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.  श्री. पवार म्हणाले, ''शेतकऱ्यांचे डोक्यावरचे ओझे उतरवून त्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, पण देशाचा विकासदर घसरला असून, कृषी आणि औद्योगिक उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. आम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करतो, सरकार खाणाऱ्यांचा विचार करते, पण पिकवणाऱ्यांचा विचार झाला, तर खाणाराही जगेल.'' काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ  नागपूरमधील हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. ही समाधानाची बाब आहे. या सरकारच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. असे झाले तरच या सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ शकू, असेही मत शरद पवारांनी या वेळी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com