शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध शेतकरी जागर मंचचा आता लढा

शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध शेतकरी जागर मंचचा आता लढा
शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध शेतकरी जागर मंचचा आता लढा

अकोला : केंद्र व राज्य सरकारच्या शेती आणि शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध पेटून उठलेल्या शेतकरी जागर मंचच्या लढ्याला शेतकऱ्यांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. कर्जमाफी, तूरीचे आंदोलनानंतर आता एक डिसेंबर रोजी होणाऱ्या कापूस-सोयाबीन परिषदेच्या माध्यमातून शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी मोठे आंदोलन उभे करण्यासाठी शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. 

निसर्गाची अवकृपा, सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि वाढत्या महागाईमुळे कुटुंबांचे पालनपोषण करणे कठीण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यान शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला असून यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढत आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची ही दैनावस्था दुर करून त्यांना जगण्याचे बळ देण्यासाठी अकोल्यात शेतकरी जागर मंचने पुढाकार घेतला आहे. 

जिल्ह्यातील काही बिगर राजकीय व्यक्तींनी एकत्रित येत स्थापन केलेल्या शेतकरी जागर मंचने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारत सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्जमाफी संदर्भातल्या जाचक अटी, सोयाबीनचा बोनस, तूरी खरेदीत होणाऱ्या अडवणूकीविरुद्ध आंदोलनाचे रान शेतकरी जागर मंचने पेटविले होते. त्याचबरोबरच शेतकऱ्यांना त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध संघटीत करून जनजागृती करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, खासदार नाना पटोले यांचा अकोल्यात शेतकरी संवाद घडवून आणण्यासाठी जागर मंचने पुढाकार घेतला होता. 

आता एक डिसेंबरला कापूस-सोयाबीन परिषदेच्या माध्यमातून सरकारविरुद्ध मोठा संघर्ष उभा करण्याची तयारी जागर मंचने सुरू केली आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरूमकार, कृष्णा अंधारे, राजू मंगळे, शेख अन्सार, विजय देशमुख, डी. एस. सुलताने, दिलीप मोहोड, डी. गावंडे, रंगराव टेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते गावागोवी सभा घेऊन जनजागृती करीत आहेत. आता पर्यंत जागर मंचतर्फे सुमारे पन्नासच्या वर गावात सभा झाल्या असून 150 गावांमध्ये सभा घेऊन आपल्या न्याय, हक्कासाठी शेतकऱ्यांनी परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांकडून वर्गणी जमा  शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी जागर मंचने उभारलेल्या लढा हा बिगर राजकीय असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्याला शेतकऱ्यांनी बळ देण्यासाठी तसेच आंदोलन, परिषदेच्या आयोजनासाठी शेतकऱ्यांकडून वर्गणी जमा करण्यात येत आहे. ज्या गावात सभा असेल तेथे शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेतकरीही एक रुपया ते किमान 100 रुपये वर्गणी स्वयंस्फूर्तीने देत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com