शेतकरी संघटनेचे १४ मे रोजी जेलभरो आंदोलन : रघुनाथदादा पाटील

शेतकरी संघटनेचे १४ मे रोजी जेलभरो आंदोलन : रघुनाथदादा पाटील
शेतकरी संघटनेचे १४ मे रोजी जेलभरो आंदोलन : रघुनाथदादा पाटील

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचा लागणारा कलंक संपला पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, ही शोकांतिका आहे. यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्यकर्ते जबाबदार आहेत. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त, निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी आणि उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी १४ मे राेजी जेलभराे आंदाेलनाची घाेषणा या वेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रेचा समाराेप शुक्रवारी (ता.२७) महात्मा फुले वाड्यात झाला. या वेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते. सुकाणू समितीचे सदस्य व बळिराजा शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गणेश जगताप, किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष का.िलदास आपटे, क्रां.ितसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, पांडुरंग रायते, नवनाथ पटारे, माजी खासदार सुधीर सावंत, सुशीलाताई माेराडे यांच्यासह शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.   पाटील म्हणाले, ‘‘सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण ठरत असताना सरकारला घाम फुटायला पाहिजे. पण, हे सरकार असंवेदनशील असून, सरकारच्या शेतकरीविराेधी धाेरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी १४ मे च्या जेल भरो आंदोलनात जातिभेद, पक्षभेद विसरून एक शेतकरी म्हणून सहभागी व्हा. सरकारच्या विरोधात एकत्र येऊन लढा उभारण्यासाठी एकतेची गरज आहे. शेतकरी संघ.िटत झाला, तरच सरकारचे डाेळे उघडणार असून, महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसणार आहे.’’ ‘‘एकीकडे सरकारने कर्जमाफीची घाेषणा केली. मात्र, ही कर्जमाफी अटी व शर्तींमध्ये अडकवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांना शेतीप्रश्‍नांवर बाेलण्यासाठी वेळ नाही. सरकारला खडबडून जागे करण्यासाठी १४ मे च्या जेल भराे आंदाेलनात ५ लाख शेतकरी स्वतःला अटक करून घेणार आहेत. शेतकऱ्यांनी कुटुंबासह स्वतःला अटक करून घ्यावे,’’ असे आवाहन या वेळी पाटील यांनी केले. २३ मार्च या शहीद दिनापासून सांगली येथून निघालेल्या यात्रेने २७ जिल्ह्यांमधून ११ हजार किलाेमीटरचा प्रवास करून समाराेप महात्मा फुले वाड्यात झाला. या वेळी शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गणेश जगताप, किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे, क्रां.ितसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, पांडुरंग रायते, नवनाथ पटारे, माजी खासदार सुधीर सावंत, सुशीलाताई माेराडे यांच्यासह शेतकऱ्यांनी मनाेगते व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com