पुनर्वासित शेतकऱ्यांकडून शासनाचा 'दहावा'

सातारा स्वाभिमानी च्या नेतृत्वाखाली पुनर्वासितांकडून शासनाचा दहावा घालण्यात आला.
सातारा स्वाभिमानी च्या नेतृत्वाखाली पुनर्वासितांकडून शासनाचा दहावा घालण्यात आला.

सातारा : सुमारे चाळीस वर्षांपूर्वी कण्हेर धरणाच्या निर्मितीवेळी मसूर (ता. कराड) परिसरात पुनर्वसन करण्यात आलेल्या वाघेश्वरसह पाच गावच्या प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी प्रांताधिकारी हिंमत खराडे यांची विनंती धुडकावून लावल्यानंतर प्रकल्पग्रस्तांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता. २६) सामूहिक मुंडण करत प्रांत कार्यालयासमोर राज्य शासनाचा दहावा घातला.

आमचे प्रश्न सोडवणे या सरकारला जमत नसेल, तर आम्हाला वेगळ्या केंद्रशासित राज्याचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. सरकारकडून कोणत्याही सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. शेतीला पाणी मिळत नाही.

जमिनीचे सातबारा उतारेही अद्यापही मिळालेले नाहीत. विकासकामांसाठी निधीही मिळत नाही, याच्या निषेधार्थ प्रजासत्ताकदिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाघेश्वर, चिंचणी, पिंपरी, कवठे आणि केंजळ या गावातील प्रकल्पग्रस्तांसह कराड प्रांत कार्यालयासमोर सामूहिक मुंडण करण्याचा इशारा दिला होता.

चाळीस वर्षांत अनेक बैठका झाल्या आहेत. आंदोलन टाळण्यासाठी खोटी आश्वासने दिली जातात, असा आमचा आजवरचा अनुभव आहे. या वेळी आम्ही गप्प बसणार नाही, असे सांगत प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी सचिन नलवडे, अनिल घराळ, शिवाजी चव्हाण यांच्यासह पाच गावच्या प्रकल्पग्रस्तांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com