शेवगाव, पाथर्डीचा पाणीप्रश्न मिटला
शेवगाव, पाथर्डीचा पाणीप्रश्न मिटला

शेवगाव, पाथर्डीचा पाणीप्रश्न मिटला

शेवगाव, जि. नगर : गेल्या चार दिवसांपासून नाशिक व नगर जिल्ह्यांत झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गुरुवार (ता. २३) पर्यंत धरणात ३८.५० टक्के पाणीसाठा झाला होता. पाण्यात वाढ झाल्याने शेवगांव-पाथर्डी तालुक्‍याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

नाशिक, नगर, औरंगाबाद जिल्‍ह्यातील वीसपैकी चौदा धरणे जवळपास शंभर टक्के भरण्याचा मार्गावर आहेत. त्यातील काही धरणे शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या पावसाचे पाणी जायकवाडी धरणात येणार असल्याने यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते, असा अंदाज अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

निळवंडे, दारणा, गंगापूर, भंडारदरा, ओझर, नांदुरमधमेश्वर जायकवाडीत आवक सुरू आहे. धरणात जेवढा जास्ती पाणीसाठा होईल तेवढा शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्‍याला फायदा होतो. आता बराचसा पाणीसाठा झाल्याने शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यांचा पिण्याच्या पाण्याचा व धरण परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पाण्याची पातळी वाढत चालल्याने धरण फुगवट्यावर शेतासाठी बसविलेले विद्युत पंप काढून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरवात केली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी गाळपेर जमिनीवरती ऊस, कापसाची लागवड केली होती ती पाण्यात जावू लागली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com