सिंधुदुर्गात हापूस हंगाम अंतिम टप्प्यात

सिंधुदुर्गात हापूस हंगाम अंतिम टप्प्यात
सिंधुदुर्गात हापूस हंगाम अंतिम टप्प्यात

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात हापूस आंबा हंगाम अंतिम टप्प्यात पोचला आहे. पश्‍चिम पट्ट्यातील आंबा हंगाम २५ मेपर्यंत  चालेल, असा अदांज आहे. मात्र पूर्व पट्ट्यात अजूनही आंबा हंगामाला म्हणावी तशी सुरवात झाली नसून, १५ मेनंतर सुरवात होणार आहे. पाऊस लांबला तरच या भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल . सततचे ढगाळ वातावरण आणि त्यामुळे फुलकिड्यां(थ्रीप्स)चा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे या वर्षी आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देवगड परिसरातून सरासरी ४५ ते ५० टन आंबा उत्पादित झाला होता. त्या तुलनेत या वर्षी आंब्याचे प्रमाण कमी आहे. या वर्षी सरासरी ३५ हजार टन आंबा उत्पादन होईल, अशी आंबा बागायतदारांना अपेक्षा आहे.

आतापर्यंत या परिसरांतील २५ हजार टन आंबा देश-विदेशांतील विविध बाजारपेठांमध्ये पोचला आहे. अजूनही साडेआठ हजार टन आंब्याची काढणी शिल्लक आहे. २५ मे आंबा हंगाम चालेल असा अदांज आहे. जानेवारीपासून आंबा हंगामाला सुरवात होते. जानेवारी ते मार्च या कालावधीत बहुतांशी आंबा वाशी मार्केटमध्ये जातो, त्यानंतरचा आंबा हा स्थानिक बाजारपेठेसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगावसह देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. सध्या आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आहे, २५ मेपर्यंतच हा हंगाम चालेल असे आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. एकीकडे देवगड परिसरातील आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील आंबा हंगामाला अजूनही म्हणावी, तशी सुरवात झालेली नाही. १५ मेनतंर या भागातील आंबा हंगामाला सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे. * शेतकऱ्याला मिळणारा सध्याचा दर- डझन ३०० ते ४०० रुपये * बाजारपेठांमधील विक्रीचा दर- ५०० ते ६०० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com