परभणीत शेतकरीप्रश्‍नी शिवसेनेचा मोर्चा

 परभणीत शेतकरीप्रश्‍नी शिवसेनेचा मोर्चा

परभणी : रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी कृषी पंपाचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यात यावा, वीज जोडण्या तोडू नये, बोंडअळीग्रस्तांना एकरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी मंगळवारी (ता.१९) शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे कृषी पंपाना पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अवाजवी आकारणी करण्यात आलेल्या बिलांची दुरुस्ती करुन द्यावी. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात यावी आदी मागण्यांसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा प्रमुख डाॅ.संजय कच्छवे, गंगाप्रसाद आणेराव, डाॅ. विवेक नावंदर, विष्णू मांडे, माणिक पोंढे, रविंद्र पतंगे, सखुबाई लटपटे यांच्यासह कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com