रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांच्या गटाची अट अंशतः शिथिल

वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख
वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख
मुंबई : रेशीम उद्योगासाठी राज्यातील पोषक वातावरण असून, रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करून देणारा उद्योग आहे. रेशीम उद्योग क्‍लस्टर पद्धतीने करण्यासाठी एका गावात शेतकऱ्यांची अट ही अंशतः शिथिल करून पहिल्या टप्प्यात शेतकरी अशी करण्यात येईल, अशी घोषणा वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. 
‘महारेशीम अभियान’चे उदघाटन मंत्रालयात श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. देशमुख म्हणाले, की रेशीम शेतीसाठी लागणाऱ्या सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील. कोष ते कापड प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
त्याचबरोबर रेशीम उद्योगापासून तयार होणाऱ्या कापडाच्या मार्केटिंगसाठी विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना देऊन या अभियानाच्या माध्यमातून या वर्षी हजार रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्टे ठेवावे आणि महारेशीम अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी पुढाकार घेणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या समतादूतांना प्रोत्साहन म्हणून पुरस्कार देण्यात यावा, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी या वेळी केल्या.
‘महारेशीम अभियान’च्या उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेतकरी प्रतिनिधी वसंत रामभाऊ सोनवणे यांच्या हस्ते फीत कापून अभियानाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी रेशीम माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com