नोटाबंदीचा निर्णय आर्थिक संकट असल्याचे सिद्ध ः यशवंत सिन्हा

या मुद्द्यावर मी बोलायच्याऐवजी जर गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावंच लागेल. -यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय अर्थमंत्री
यशवंत सिन्हा
यशवंत सिन्हा

नवी दिल्ली ः देशाचा विकासदर (जीडीपी) वाढविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे होते. मात्र अशावेळी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर जीएसटीसुद्धा लागू करण्यात आला. यामुळे व्यापाऱ्यांसह जनसामान्यांमध्ये गोंधळ उडाला व भीती निर्माण झाली. अनेक उद्योग बंद पडले, रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असे सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितले जात आहे. परंतु सद्यःस्थितीवरून नोटाबंदीचा निर्णय हे आर्थिक संकट असल्याचे सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

माजी अर्थमंत्री म्हणाले

  • नोटाबंदीचा निर्णय खूप चुकीच्या पद्धतीने लागू केला
  • आर्थिक विकासदरात सातत्याने घट होत आहे
  • खासगी गुंतवणुकीत मोठी घट झाली आहे
  • जवळपास सर्वच क्षेत्रांतील निर्यात ठप्प झाली आहे
  • औद्योगिक उत्पादनाचा वेगही मंदावला आहे
  • कच्चे तेल, इंधनाच्या वाढत्या किमती चिंताजनक
  • कृषीसह उत्पादन, रोजगार आणि सेवा क्षेत्रही संकटात
  • मला बोलावंच लागेल... सध्याच्या आर्थिक मंदीसदृश परिस्थितीवर चिंता व्यक्त करून सिन्हा म्हणाले, की आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला खूप खाली खेचले आहे. या मुद्द्यावर मी बोलायच्याऐवजी जर गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावंच लागेल, असे म्हणत त्यांनी थेट अर्थमंत्री जेटलींवर हल्लाबोल केला.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com