इगतपुरीत भात लावणीला वेग

इगतपुरीत भात लावणीला वेग
इगतपुरीत भात लावणीला वेग

इगतपुरी, जि. नाशिक  : इगतपुरी तालुक्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच गाव पाड्यांमध्ये भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यात १२४ गावे आणि १५० पेक्षा अधिक पाडे आहेत. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात समाधानकारक पावसामुळे पावसाळी भात शेतीची (आवणीची) कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

पारंपरिक बियाणे आणि सुधारित बियाण्यांची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. सध्या जवळपास २७ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, एकूण लागवड ९० टक्क्यांपर्यंत झाली आहे. गरी कोळपी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व अत्यंत चविष्ट असलेल्या या बारीक तांदळाची दिवसेंदिवस लागवड कमी होत आहे. या पारंपरिक बियाण्याऐवजी दप्तरी, ओम १२५, १००८ या सुधारित भात बियाण्यांची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

इगतपुरी तालुक्यात प्रामुख्याने भात शेती हे मुख्य पीक घेतले जाते. याबरोबर इतर पिकांमध्ये नागली, वरई, भुईमुगासह भाजीपाला पिकेदेखील आता मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सरासरी ३४०० ते ४००० मिमी पावसाची नोंद होणाऱ्या इगतपुरी तालुक्यात आजपर्यंत २१६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे सरसरी ६५ ते ७० टक्के पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com