नगर जिल्ह्यात पावसाअभावी पेरणीसह शेतीची कामे थांबली

कापूस लागवड रखडली
कापूस लागवड रखडली

नगर  ः जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला असला, तरी अद्याप अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीसह शेतीची कामे रखडली आहेत. आतापर्यंत अकोले तालुक्‍यात भात लागवड, तर राहुरी तालुक्‍यात कापूस लागवडीला सुरवात झाली आहे. सुरवातीच्या काळात पाऊस झाला नसल्याने मूग, उडदाचे क्षेत्रही कमी होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात खरिपात ४ लाख २४ हजार ४९६ हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यानुसारच कृषी विभागाने खते, बियाणे व अन्य उपाययोजनांचे नियोजन केले आहे. पावसाळा सुरू होऊन आठ दिवसांचा कालावधी झाला असला, तरी अजूनही पाऊस नाही. गतवर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे मूग व उडदाचे क्षेत्र वाढले होते.

यंदा मात्र सुरवातीलाच पावसाने खंड दिल्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत फक्त राहुरी तालुक्‍यात १६९८ हेक्‍टरवर कापूस, तर अकोल्यात ७२ हेक्‍टरवर भाताची लागवड झाली आहे. दरवर्षी या काळात अकोले तालुक्‍याच्या पूर्व भागातील आदिवासी पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू असतो. यंदा अजून त्या भागातही पाऊस नाही. मात्र पाऊस येण्याची शक्‍यता गृहीत धरून भात लागवडीसाठी मात्र आदिवासी भागात कामांची लगबग सुरू आहे. जामखेड, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा भागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. अजून कोठेही लागवड झाली नाही.

यंदा पुर्वमोसमी पावसाने बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली. मॉन्सूनच्या आगमनानंतर साधारण २२ जूनपर्यंत पावसात खंड पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने शेतकऱ्यांना सूचित करत चांगला पाऊस होईपर्यत पेरणी, कापूस लागवड न करण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून लागवड, पेरणी झाली नाही. अन्यथा नेहमीप्रमाणे पेरणी करून पुन्हा दुबार पेरणीचे संकट उभा राहिले असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com