खानदेशातील पेरणी १० टक्क्यांनी वाढली

खानदेशातील पेरणी १० टक्क्यांनी वाढली
खानदेशातील पेरणी १० टक्क्यांनी वाढली

जळगाव : मागील वर्षाच्या तुलनेत पावसाची स्थिती बरी असल्याने खानदेशात नापेर क्षेत्र कमी झाले अाहे. मागील हंगामात जवळपास १८ टक्के क्षेत्र नापेर राहिले होते. त्यात कडधान्य व तृणधान्याला मोठा फटका बसला होता. यंदा फक्त आठ टक्के क्षेत्रावर कोणत्याही पिकाची पेरणी होणार नाही, अशी स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात सात लाख ६५ हजार हेक्‍टर, धुळ्यात चार लाख २० हजार आणि नंदुरबारात दोन लाख ७३ हजार हेक्‍टरवर पेरणीचा लक्ष्यांक खरिपासंबंधी ठेवण्यात आला. जळगाव जिल्ह्यात जवळपास ९०, धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा भागात ९२, तर नंदुरबारात ८८ टक्‍क्‍यांवर पेरणी झाली आहे. मागील हंगामात जुलैअखेरपर्यंत खानदेशात ७५ टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यातही तिबार पेरणी करावी लागली होती. कापूस, तृणधान्ये व कडधान्य पिकांना मोठा फटका बसला होता.

धुळे तालुक्‍यातील काही भागात आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगावात सोयाबीन आणि तृणधान्याची दुबार पेरणी करावी लागली. कापसाचे पीक कोठेही मोडण्याची वेळ आलेली नाही. धुळे जिल्ह्यातही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जळगावातही काही भागांचा अपवाद वगळला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कापसासह कडधान्ये, तृणधान्ये व गळीतधान्यांची वाढ चांगली दिसत आहे.

खानदेशात सुमारे ७ लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक साडेचार लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. याबरोबरच जवळपास ८० हजार हेक्‍टरवर ज्वारी व बाजरी आहे. तर, सोयाबीनची पेरणी यंदा मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे १ हजार हेक्‍टरने कमी झाल्याचे सांगण्यात आले. पेरणी जवळपास साडेअठ्ठावीस हजार हेक्‍टरवर झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com