रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्‍टरवर भात पेरणी

रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्‍टरवर भात पेरणी
रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्‍टरवर भात पेरणी

रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील ६६६४.९ हेक्‍टर क्षेत्रावरील भात पेरणी पूर्ण झाली आहे. ९४५.०४ हेक्‍टरवरील नागलीची पेरणी झाली आहे. या आठवड्यात पेरणी पूर्ण होणार असून जमिनीची उखळ करण्याची कामे वेगाने सुरू आहेत.

कोकणातील भातशेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.त्यामुळे शेतकरी नेहमीच पावसाची प्रतीक्षा करत असतात. हंगामाच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे वेळेत सुरू झाली.

जिल्ह्यात ६८५५४ हेक्‍टरवर भातपिकाचे क्षेत्र आहे.त्यासाठी ७,७४७ हेक्‍टरवर पेरणी केली जाणार आहे. तर नागलीचे १२००१ हेक्‍टरवर नागलीचे पीक घेतले जाते. यापैकी १७३३ हेक्‍टरवर लागवड केली जाणार आहे. पाऊस चांगला असल्याने सोमवारपर्यंत ६६६४.९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून ९४५.४ हेक्‍टरवर नागलीचे कामे पूर्ण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com