उधार-उसणवारी, पदरमोड करून दिवाळी साजरी

यंदा कमी पावसामुळे पिकाचा उतारा कमी आला. कापूस निघाला आहे. कमी भाव असल्यामुळे अजून विकला नाही. दिवाळीसाठी पदरमोड करावी लागली. - शिवानंद लांडगे, बनवस, ता. पालम, जि .परभणी.
शिवारात दिवाळी सणाच्या धामधुमीत सोयाबीन काढणीची कामे सुरु होती.
शिवारात दिवाळी सणाच्या धामधुमीत सोयाबीन काढणीची कामे सुरु होती.

दिवाळी शेतकऱ्यांची... परभणी ः खरिप हंगामात दुबार तिबार पेरणी करूनही हाती काही लागले नाही. रब्बी हंगामातही दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. निसर्गाने हाती आलेल्या पिकासोबतच दिवाळीचा आनंद हिरावून घेतला. परतीच्या पावसामुळे लाबंलेली रब्बीची पेरणी आणि सोयाबीनची सुगी सुरू असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना शेतकामातून दिवाळी साजरी करण्यासाठी उसंत मिळाली नाही. खरीप हंगाम वाया गेलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना उधार-उसणवारी, पदरमोड करून दिवाळी साजरी करावी लागली तर दिवाळीसाठी उधार -उसणवारी करण्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आदी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री केली. कर्जमाफीच्या लाभार्थीना प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली; परंतु अनेक शेतकऱ्यांना लाभार्थीच्या यादीतील शोधून सापडले नाही. आता दिवाळसण संपला आहे. माॅन्सून परतला तरी ईशान्य माॅन्सून पाठीमागे लागलाय त्यापासून हाती आलेली पिके वाचविण्यासाठी एकीकडे शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे रब्बीची पेरणीदेखील वाया गेल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. यंदा निसर्गाने शेतकऱ्यांच्या दिवाळाची आनंद हिरावून घेतला आहे, असे सातत्याने अस्मानी सुल्तानी संकटाचे आघात सोसत असलेल्या शेतकऱ्यांना वाटत आहे. यंदा परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधी अवर्षणाचा आणि नंतर अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मूग, उढीद,सोयाबीन, कापूस आदी खरिप पिकांच्या उतारा घसरला आहेत. त्यात ही पिके काढणीच्या काळात आलेल्या पावसामुळे हाती आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनातील घट, मजुरीचे वाढलेले दर, डागील मालामुळे शेतमालाला मिळणारे हमीभावापेक्षा कमी दर यामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला. मागचेच वर्षे बरे होते असे म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा गतवर्षीपेक्षा यंदा दिवाळी काही दिवस लवकर आली. ती तब्बल आठवडाभर दिवाळी होती; परंतु दिवाळीच्या काळातच रब्बी पेरणी, सोयाबीनची काढणी, कापूस वेचणी ही सारी कामे सुरू होती. त्यात पाऊस येण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकामे उरकण्यासाठी सकाळ ते संध्याकाळपर्यंत शेतामध्येच रहावे लागले. त्यामुळे शेतकरी तसेच शेतमजूर वर्गाला दिवाळी सण साजरे करण्यासाठी जरादेखील उसंत मिळाली नाही. यंदा अजिबात पाऊस नसल्यामुळे खरीप हंगामात काहीच हाती लागले नाही. रब्बीची पेरणी केली, परंतु जास्त पावसामुळे ज्वारी उगवली नाही. हरभऱ्यास मर लागली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कशाची दिवाळी आली साहेब. - बालासाहेब हरकळ, शेतकरी, गौंडगाव, ता. पाथरी, जि. परभणी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com