‘कृषी’तील लाचखोरीवर विधानसभेत तारांकित प्रश्‍न

‘कृषी’तील लाचखोरीवर विधानसभेत तारांकित प्रश्‍न
‘कृषी’तील लाचखोरीवर विधानसभेत तारांकित प्रश्‍न

नागपूर : कृषी सेवा केंद्राच्या तपासणीदरम्यान कृषी अधिकाऱ्यांकडून लाखोची वसुली झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. आष्टी येथील आमदार ॲड. भीमराव धोंडे व वरळी येथील आमदार सुनील शिंदे यांनी हा प्रश्‍न विचारला आहे.

कृषी सेवा केंद्र तपासणीच्या आड त्रुटी असल्याचे सांगत कृषी अधिकाऱ्यांकडून हजारोंची वसुली होते. दर आठवड्याला कृषी सेवा केंद्राची तपासणी काही जिल्हे, तालुक्‍यात होते. ही तपासणी केवळ हप्ते वसुलीकरीताच होत असल्याचा आरोप आहे. या माध्यमातून लाखो रुपयांची माया गुणनियंत्रण अधिकाऱ्यांकडून जमविण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. गुणनियंत्रण विभागातील लाचखोरीचा हाच धागा पकडत आमदार धांडे व शिंदे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला आहे. विधानसभेत पहिल्यांदाच कृषी विभागातील गुणनियंत्रण शाखेकडून होणाऱ्या गैरप्रकाराच्या संदर्भाने थेट तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.

आमदारांनी उपस्थित केले प्रश्‍न विषारी कीटकनाशक फवारणी दरम्यान शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर सरकारने चार कीटकनाशकांवर बंदी घातली. त्यानंतर कृषी सेवा केंद्र तपासणीचे आदेश देण्यात आले. ही तपासणी करताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची लाच घेतल्यासंदर्भाने तारांकीत प्रश्‍न विचारण्यात आला आहे. या संदर्भात सरकारने काय चौकशी केली आणि चौकशीअंती दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली, याविषयी देखील विचारणा करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com