‘विहिरीसाठी असलेली अट १ एकरवरून अर्धा एकर करणार’

‘विहिरीसाठी असलेली अट  १ एकरवरून अर्धा एकर करणार’
‘विहिरीसाठी असलेली अट १ एकरवरून अर्धा एकर करणार’

कोल्हापूर : सामाजिक न्याय विभागाकडे असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गंत विहिरीसाठी असलेली किमान १ एकर क्षेत्राची अट शिथिल करून ती अर्धा एकर करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी (ता.१) येथे दिली.  सामाजिक न्याय विभागाकडील योजनाचा आढावा घेण्यासाठी सर्किट हाउस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री कांबळे म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गंत विहिरीसाठी सध्या लाभार्थीची किमान १ एकर क्षेत्राची अट आहे, त्यामुळे १ एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, ही बाब विचार घेऊन या योजनेसाठी किमान १ एकर क्षेत्राची असलेली अट शिथिल करून ती अर्धा एकर करण्याचा शासनाचा विचार आहे. मात्र ज्यांचे क्षेत्र १ एकरापेक्षा जास्त आहे, त्यांनाही या योजनेत प्राधान्य राहील, असे श्री. कांबळे यांनी या वेळी स्पष्ट केले. सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी दुधाळ जनावरे व  शेळी गट पालनाची योजना असून या योजनेंतर्गत सध्या १० शेळ्यांच्या गटासाठी अनुदान दिले जाते, ही मर्यादा वाढवून ती आता २० शेळ्याच्या गटासाठी अनुदान देणाचा शासनाचा प्रयत्न राहील, असे त्यांनी या वेळी सांगितले. बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार सुनील शेरखाने, तसेच समाजकल्याण विभागाचे निरीक्षक संजय पवार उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com