वऱ्हाडाच पाच लाखांवर शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः असंख्य अडचणींवर मात करीत शेतकऱ्यांनी या हंगामात पीकविमा काढला असून, वऱ्हाडातील शेतकऱ्यांची संख्या सध्या पाच लाखांवर पोचली अाहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांमध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली अाहे. पीकविमा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही संख्या अाणखी वाढण्याची शक्यता अाहे, तर दुसरीकडे सुविधा केंद्रांवरील गर्दी अोसरल्याचे चित्र दिसून अाले. सोमवारी (ता.३० जुलै) सायंकाळपर्यंत दाखल अर्जाचा अाढावा घेतला असता, एकट्या बुलडाणा जिल्ह्यात या वर्षी शेतकऱ्यांची संख्या ५५ हजारांनी वाढल्याचे समोर अाले.

गेल्या हंगामात कमी उत्पादन, पिकांवर बोंड अळीसह इतर किडींचा प्रादुर्भाव, काढणीच्या काळात अालेला पाऊस अादी कारणांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या वर्षात पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना काहीअंशी मदत मिळाली. या हंगामात लागवड केलेल्या पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अाॅनलाइन सातबारा न मिळणे, सुविधा केंद्रावर अर्ज दाखल करण्यासाठी लिंक न मिळणे अशा स्वरूपाच्या अडचणी अाल्या. तरीदेखील शेतकऱ्यांनी अडचणींना सामोरे जात विमा काढण्यासाठी धडपड केली. परिणामी

वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत मागील हंगामापेक्षा मोठ्या प्रमाणात विमा उतरविण्यात अाला अाहे. अकोला जिल्ह्यात मागील वर्षी एक लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. या वर्षी ३० जुलैपर्यंत दाखल अर्जांचा विचार केला तर एक लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला अाहे. यात एक लाख १०हजार बिगर कर्जदार तर ३६ हजार कर्जदार शेतकरी अाहेत.

वाशीम जिल्ह्यात एक लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला. गेल्या वर्षी हीच संख्या एक लाख १४ हजार एवढी होती. अातापर्यंत दाखल अर्जांमध्ये एक लाख १३ हजार कर्जदार अाणि ३५ हजार बिगर कर्जदार शेतकरी अाहेत. बुलडाणा जिल्ह्यात या वर्षी अाजवर दाखल अर्जात गेल्या हंगामाच्या तुलनेत शेतकऱ्यांची संख्या ५५ हजारांनी जास्त अाहे. गेल्या वेळी १ लाख ५२ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. या वर्षी पीकविमा काढणाऱ्यांची संख्या अातापर्यंत दोन लाख सात हजार झाली अाहे. यात अाठ हजार कर्जदार असून उर्वरित सर्व बिगर कर्जदार शेतकरी अाहेत. मुदत संपेपर्यंत शेतकरी संख्या अाणखी ५० हजारांपर्यंत वाढू शकेल, अशी अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली. शेवटच्या दिवशी अाॅफलाइनची सुविधा पीकविमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याने बँकांनी या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत शेतकऱ्यांकडून अाॅनलाइन; तसेच अाॅफलाइन अर्ज स्वीकारता येतील, अशी सोय करून दिली होती. अालेल्या अर्जातील शेतकरी यादी व विमा हप्ता रक्कम विमा कंपनीकडे ३१ जुलैला रात्री १२ वाजेपर्यंत बँकांनी जमा करावी, अशी सूचना करण्यात अाली होती.

शेतकऱ्यांची माहिती वेबपोर्टलवर ९ अाॅगस्टपर्यंत भरावी लागणार अाहे. सुविधा केंद्रांनीही ३१ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारावेत व त्याच दिवशी विमा कंपनीकडे हप्ता जमा करावा, अशी सूचना कृषी अायुक्तांनी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com