नगर जिल्ह्यात मनरेगाच्या कामांवर ८६४४ मजूर कार्यरत

रोजगार हमी योजना
रोजगार हमी योजना

नगर : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या विविध कामांवर ८६४४ मजूर काम करत आहेत. सध्या चौदा तालुक्‍यांत १६६३ कामे सुरू असल्याचा ग्रामपंचायत विभागाचा अहवाल आहे. याशिवाय सुमारे ३६ हजार ४० कामे मजुरांनी मागणी केल्यानंतर लगेच सुरू करण्याच्या स्थितीमधील असल्याचे रोहयो विभागातून सांगण्यात आले.

मजुरांना रोजगार मिळावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावपातळीवर वैयक्‍तिक व सार्वजनिक कामे केली जातात. ग्रामपंचायतीत ग्रामसभेच्या मंजुरीनंतर वार्षिक आराखडा मंजूर केला जातो. त्यानंतर मजुरांनी केलेल्या मागणीनुसार कामे केली जातात.

सध्या जिल्ह्यामधील १४ तालुक्‍यांत १६६३ कामे सुरू असून, त्या कामांवर ८६४४ मजूर काम करत आहेत. त्यात ग्रामपंचायतीमार्फत १२०७ कामे सुरू असून, तेथे ५४१८ मजूर, तर यंत्रणांची ४५६ कामे सुरू असून, त्यावर ३२२६ मजूर काम करत आहेत. ग्रामपंचायतीची सध्या सुमारे २२ हजार ६१९, यंत्रणेची १३ हजार ४२१ कामे सेल्फवर असून, मजुरांनी मागणी केली की ती लगेच सुरू करता येतील अशी स्थिती आहे. सेल्फवरील कामांची पावणेपंचेचाळीस लाख मजूरक्षमता आहे, असे जिल्हा परिषदेच्या रोहयो विभागातून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com