गिरणाच्या पाण्यासाठी आज रास्ता रोको

गिरणाच्या पाण्यासाठी आज रास्ता रोको
गिरणाच्या पाण्यासाठी आज रास्ता रोको

जळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे गिरणा पट्ट्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने धरणातून थेट चोरगाव, नंदगावपर्यंत पाण्याचे आवर्तन सोडावे, या मागणीसाठी चांदसर, नंदगाव, फेसर्डीसह पंधरा गावांतील ग्रामस्थांतर्फे मंगळवारी (ता. २६) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.  

गिरणा धरणातून १५ मार्च रोजी पाणी सोडण्यात आले, परंतु हे पाणी अजूनही कानळदा (ता. जळगाव) पर्यंत पोचले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

दुष्काळी परिस्थितीमुळे गिरणा नदीकाठीदेखील पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. नदीत पाणी नसल्याने कूपनलिका आटत आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कूपनलिकांचे स्राेत कमी झाले आहेत. दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यातच नदीत पाणी सोडले आहे. परंतु, ते फक्त कानळदापर्यंत येणार आहे. 

ही बाब लक्षात घेऊन गिरणा धरतातून आवर्तन सोडावे, या मागणीसाठी या गावातील सरपंचांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात त्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनातर्फे अद्यापही आवर्तन सोडण्यात आले नाही. त्यामुळे आता ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com