पाणीपुरवठा समित्यांवर गुन्हे दाखल करा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : भारत निर्माण योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ५४ पाणीपुरवठा योजनांमधील गैरव्यवहार प्रकरणी संबंधित गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

भारत निर्माण योजनेतून संबंधित पाणी योजनांसाठी निधी मंजूर झाला. ग्रामपंचायतींच्या खात्यात तो निर्देशानुसार वर्ग झाला. योजना राबविण्याची जबाबदारी, खर्चासंबंधीचे अधिकार गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर नियमानुसार दिली होती. पण योजना अपूर्णच आहेत. त्यात काही योजना २००४ पासून अपूर्ण आहेत. कामांच्या नोंदी नसणे, रेकॉर्ड उद्ययावत नसणे, कामांचे व्हिडिओ चित्रीकरणाचे आदेश धुडकावणे आदी प्रकार जिल्हा परिषदेतील वरिष्ठांना तपासणीत दिसून आले.

या योजनेतून १९० कामेच जिल्हाभरात पूर्ण झाली. तर २८० कामे अपूर्ण असून, यातील ५४ ग्रामपंचायतींतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये गैरव्यवहार दिसून आला. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.

...तर जिल्हास्तरावरून कार्यवाही संबंधित ५४ योजनांप्रकरणी प्रथम पाणीपुरवठा समितीवर गुन्हे दाखल करावेत. संबंधित तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता किंवा अधिकारी यांनी फिर्याद दाखल करायची. फिर्याद सात दिवसांत दिली नाही, तर जिल्हास्तरावरून थेट सीईओ कार्यालय फिर्याद दाखल करण्याचे काम हाती घेईल, असेही सीईओ दिवेगावकर यांनी बजावले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com