देशात साखर उत्पादन ८२ लाख टनांनी वाढले

देशात साखर उत्पादन ८२ लाख टनांनी वाढले
देशात साखर उत्पादन ८२ लाख टनांनी वाढले

कोल्हापूर: यंदाच्या हंगामात देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक साखर निर्मिती झाली आहे. मार्चच्या मध्यापर्यंत  ९३.८३ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन घेत महाराष्ट्र अग्रेसर राहिले आहे.  देशात यंदाच्या हंगामात सगळीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात ८२.३६ लाख मेट्रीक टन साखरेचे जादा उत्पादन झाले आहे.  साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व उत्तरप्रदेश ही राज्ये महत्त्वाची मानली जातात. देशाच्या एकूण उत्पादनापैकी किमान सत्तर टक्के साखर उत्पादन या तीन राज्यांतूनच होते. हंगाम सुरू होण्याअगोदर तीन महिन्यांपर्यंत देशात पावसाअभावी उसाची स्थिती खूपच बिकट होती. परंतु हंगाम सुरू होण्याअगोदर एक महिना देशात सर्वत्र विक्रमी पाऊस झाला. निर्यात शुल्क काढले असले तरी या घोषणेनंतर साखरेच्या दरात फारशी वाढ झाली नसल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. ज्या वेळी कारखाने निर्यात करण्यास सुरवात करतील त्याचवेळी दराचा फरक दिसून येऊ शकतो, अशी माहिती कारखान्यांच्या प्रतिनिधींनी दिली.  १०६ कारखान्यांची धुराडी थंडावली साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदा ५२३ साखर कारखान्यांनी आपला हंगाम सुरू केला. १५ मार्च अखेर १०६ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटपला आहे. बंद झालेल्या कारखान्यांमध्ये महाराष्टातील ३१, कर्नाटकातील ४८, उत्तरप्रदेशातील ५, तामिळनाडूतील ९, आंध्रप्रदेशातील ७ आणि अन्य राज्यांतील ७ कारखाने बंद झाले आहेत.  महाराष्ट्र अग्रेसर साखर उत्पादनात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी यंदा ९३.८३ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन केले आहे. उत्तरप्रदेशात ८४.३९ टन तर कर्नाटकात ३५.१० मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गुजरातमध्ये ९, बिहारमध्ये ५, पंजाबमध्ये ५ तर तामिळनाडूत ५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे.  २० लाख टन निर्यातीची अपेक्षा गेल्या हंगामात ४० लाख मेट्रीक टन साखर शिल्लक आहे. हा दबाव झुगारण्यासाठी यातील किमान २० लाख मेट्रीक टन साखर बाहेर गरजेचे आहे. तर पुढील हंगामात निर्माण होणारी ४० ते ५० लाख मेट्रीक टन साखर निर्यात झाली तरच साखर उद्योगाची घडी पुढील काही महिन्यांत नीट बसू शकेल असा अंदाज साखर तज्ज्ञांचा आहे. १४ हजार कोटी थकबाकी देशात पडलेले दर आणि साखर उद्योगासमोरील इतर समस्यांमुळे जानेवारी महिन्यापर्यंत देशातील साखर कारखान्यांकडे एकूण १४ हजार कोटींची देणी बाकी आहे. देशातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत २५.८० दशलक्ष टन साखर निर्मिती केली आहे. सर्वात जास्त साखर उत्पादन महाराष्ट्रात त्यानंतर उत्तप्रदेशात झाले आहे. सध्या दर उत्पादन खर्चाच्या ३५०० ते ३६०० रुपयांपेक्षा कमी असल्याने कारखान्यांना सध्या तोटा सहन करावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com