उत्तर प्रदेशात ऊस थकबाकी १८ अब्ज रुपयांपर्यंत

साखर कारखाने
साखर कारखाने

नवी दिल्ली ः आॅगस्टअखेर उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे १८.३४ अब्ज रुपये थकले आहेत, अशी माहिती राज्याच्या ऊस विकास विभागाने नुकतीच दिली.

उत्तर प्रदेशात निवडणुका होऊन आदित्यनाथ सरकार सत्तेवर आले. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांनी २०१६-१७ च्या थकबाकीवर १५ टक्के प्रतिवर्ष व्याजदराने ऊस उत्पादकांना कारखान्यांनी थकबाकी द्यावी, असे निर्देश दिले होते. आॅगस्टअखेर थकबाकीवरील एकूण व्याज ३.२८ अब्ज झाले आहे. २०१६-१७ (आक्टोबर ते सप्टेंबर) मध्ये येथील कारखानदारांनी २५३.८७ अब्ज रुपयांपैकी २३५.५३ अब्ज रुपये दिले आहेत. काही खासगी कारखान्यांकडे २७०.३० दशलक्षांची थकबाकी अद्याप शिल्लक आहे.

‘सॅप‘मध्ये वाढ नाही? सलग तीन वर्षे कोणत्याही प्रकारची वाढ न करता अखेर २०१६-१७ मध्ये राज्य निर्धारित मुल्यात (सॅप) प्रति शंभर किलोमागे २५ रुपयांनी वाढ केली होती. यामुळे उसाला ३०५ रुपये दर मिळाला होता. हे दर २०१७-१८ मध्येही कायम ठेवून त्यात काहीही वाढ करण्याचा विचार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com