पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः जिल्ह्यात १७ साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊस गाळप सुरू आहे. आता या कारखान्यांचा निम्मा हंगाम संपला आहे. पाणीटंचाईची वाढती तीव्रता व जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची स्थिती बघता साखर कारखाने लवकर बंद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७ साखर कारखान्यांनी ७१ लाख ३० हजार १०७ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ७७ लाख २७ हजार ४६५ क्विटंल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.८४ टक्के आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने दिली. 

शासनाने एक आॅक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगामास सुरवात केली होती. जिल्ह्यात सहकारी ११ व खासगी ६ साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता २५०० ते ७५०० मेट्रीक टन आहे. सध्या निम्मा गळीत हंगाम संपला असून अजून दोन ते तीन महिने साखर कारखाने सुरू राहतील अशी शक्यता आहे.  

जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी आतापर्यंत ४४ लाख ८१ हजार २४९ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ४८ लाख ३७ हजार ३९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.७९ टक्के आहे. खासगी साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत २६ लाख ४८ हजार ८५८ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २८ लाख ९० हजार ७० क्विटंल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.९१ टक्के आहे. आत्तापर्यंत झालेल्या गाळपात बारामती ॲग्रो कारखान्याने ६ लाख ९८ हजार २१५ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ७ लाख ६५ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.९७ टक्के आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com