पुणे जिल्ह्यात ३२ लाख ५९ हजार टन उसाचे गाळप

गाळप हंगाम
गाळप हंगाम

पुणे : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण १७ साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत ३२ लाख ५९ हजार १६९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ३२ लाख ९६ हजार ४७० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.११ टक्के एवढा असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. 

 
जिल्ह्यात बारा सहकारी तर सहा खासगी 
साखर कारखाने आहेत. यापैकी बहुतांशी साखर कारखाने हे एक नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. थेऊर येथील यशवंत कारखाना बंद आहे. सध्या ऊस क्षेत्रात तोडणी कामगारांची चांगलीच लगबग सुरू असून साखर कारखानेही वेगाने सुरू आहेत. काही ठिकाणी उसाची उपलब्धता कमी असली तरी तो मिळविण्यासाठी ऊस पट्ट्यातून उसाची पळवापळवी सुरू आहे. त्यामुळे हंगाम लवकर संपणार अशी परिस्थिती काही कारखान्यांची आहे. 
 
जिल्ह्यातील सहकारी अकरा साखर कारखान्यांची रोजची गाळप क्षमता ४६ हजार टन एवढी आहे. या कारखान्यांनी वीस लाख ९० हजार ५२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २० लाख ९२ हजार ९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा १०.०१ टक्के आहे.
 
खासगी सहा साखर कारखान्यांची २२ हजार ५०० टन एवढी गाळप क्षमता आहे. या कारखान्यांनी अकरा लाख ६९ हजार ११७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १२ लाख ४ हजार ३७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा १०.३० टक्के एवढा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com