पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरच राज्य कारभार सुरू आहे.
ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप साडेपंधरा लाख टनांनी वाढले
गुरुवार, 8 मार्च 2018
टीम अॅग्रोवन
सातारा ः जिल्ह्यात उसाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत सुमारे १५ लाख ५० हजार ६७५ मेट्रिक टन उसाचे अधिक गाळप झाले आहे. जिल्ह्यात सोमवारअखेर (ता. ५) ६९ लाख ८१ हजार ८३२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ८१ लाख ७७ हजार २१५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे तसेच अनेक कारखान्यांनी वाढविलेली गाळप क्षमता यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अधिक गाळप झाले आहे.
सातारा ः जिल्ह्यात उसाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत सुमारे १५ लाख ५० हजार ६७५ मेट्रिक टन उसाचे अधिक गाळप झाले आहे. जिल्ह्यात सोमवारअखेर (ता. ५) ६९ लाख ८१ हजार ८३२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ८१ लाख ७७ हजार २१५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे तसेच अनेक कारखान्यांनी वाढविलेली गाळप क्षमता यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अधिक गाळप झाले आहे.
जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ६९ लाख ८१ हजार ८३२ मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे ८१ लाख ७७ हजार २१५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षी १५ मार्च अखेर ५४ लाख ३१ लाख १५७ मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे ६५ लाख १६ हजार १८६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी १५ लाख ५० हजार ६७५ मेट्रिक टन उसाचे अधिक गाळप झाले तर १६ लाख ६१ हजार २९ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने या हंगामाचे दिवस लांबणार असून, अनेक कारखान्यांचा गाळप एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्याचे सांगितले जात आहे. या गाळप हंगामात सह्याद्री कारखान्याने गाळप व साखरनिर्मितीत तर जयवंत शुगरने साखर उताऱ्यात आघाडी कायम ठेवली आहे.
एफआरपी रकमेत झालेल्या वाढीमुळे उसाचे दरात शाश्वती आली आहे. यामुळे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहेत. पुढील गाळपासाठी जिल्ह्यात अजूनही उसाची लागवड केली जात असल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. या दृष्टीने साखर कारखान्यांना गाळप हंगामाचे नियोजन करावे लागणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत गाळपाचे आकडे वाढले असले तरी जिल्ह्यातील सरासरी उताऱ्यात मात्र घट झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी सरासरी १२ टक्के साखर उतारा मिळाला होता, या वर्षी मात्र ११.७१ टक्के सरासरी उतारा मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.२९ टक्के साखर उतारा कमी मिळत आहे. सहकारी कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यात ०.१९, तर खासगी कारखान्यांच्या साखर उताऱ्यात ०.३१ टक्क्यांनी घट झाली आहे.
इतर ताज्या घडामोडी
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभअकोला ः शासनाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या डॉ....
जळगावसह रावेर मतदारसंघ भाजपकडेच?जळगाव ः आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना व...
किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना...धुळे : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी...
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
- 1 of 349
- ››