मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत. रविवारअखेर (ता. २०) या कारखान्यांनी ४९ लाख १८ हजार ७०७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून ४८ लाख ८२ हजार १३६ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या सर्व साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९३ टक्‍के राहिला आहे.

यंदा गाळप हंगामात नंदूरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी ६ लाख ५ हजार २८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले तर ५ लाख ९२ हजार ८११ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.८ टक्‍के आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी २ लाख ६० हजार ३४५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ९.१८ टक्‍के साखर उताऱ्यानुसार या कारखान्यांनी २ लाख ३८ हजार ९२५ क्‍विंटल साखर उत्पादन केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी ९ लाख १७ हजार ९६६ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ९ लाख २८ हजार २४० क्‍विंटल साखर उत्पादन घेतले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्‍के आहे. जालना जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी १२ लाख १७ हजार १८८ मेट्रिक टन उसाचे गाळप करत १२ लाख ६२ हजार ८०० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या पाचही साखर कारखान्यांचा साखर उतारा १०.३७ टक्‍के राहिला.

बीड जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी १९ लाख १८ हजार १७८ मेट्रिक टन उसाचे गाळप करत १८ लाख ५९ हजार ३६० क्‍विंटल साखर उत्पादित केली. बीड जिल्ह्यातील सातही साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.६९ टक्‍के असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com