ऊसदराबाबत बैठक घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा आग्रह
ऊसदराबाबत बैठक घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा आग्रह

ऊसदराबाबत बैठक घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा आग्रह

पुणे : ऊसदराबाबत राज्यासाठी साखर कारखान्यांसोबत येत्या दोन नोव्हेंबरला पुण्यात बैठक घेण्याची तयारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गटाकडून सुरू आहे; मात्र या बैठकीविषयी साखर आयुक्तालय संभ्रमात असल्याचे दिसून येते.   खासदार राजू शेट्टी यांच्या ऊसदर आंदोलनाची दिशा निश्चित होण्याच्या आधीच शेट्टी गटाला शह देण्यासाठी खोत गटाकडून या बैठकीची तयारी केली जात असल्याचे सांगितले जाते. राज्याचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी परंपरेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक होते. तशी बैठक यापूर्वीच झालेली असून, गाळप हंगाम येत्या एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्याची प्रक्रियादेखील सुरू झालेली आहे. त्यामुळे या बैठकीबाबत साखर आयुक्तालयाकडे अजून कोणतीही सूचना मंत्रालयातून आलेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना भेटून पुण्यात साखर कारखानदारांची बैठक घेण्याचा आग्रह धरला होता. मंत्री खोत यांच्या मागणीमुळे खासदार शेट्टी यांच्या ऊसदर आंदोलनाला शह मिळू शकतो. त्यामुळे या मागणीला सहकारमंत्री देशमुख यांनी पाठिंबा देत दोन नोव्हेंबरला बैठक घेण्याचे आश्वासनदेखील खोत यांना दिलेले आहे; मात्र बैठकीचा अधिकृत अजेंडा बाहेर पडल्यामुळे संभ्रम वाढला आहे.  गेल्या हंगामाच्या तुलनेत उसाच्या किफायतशीर व रास्त दरात (एफआरपी) १०.६ टक्के म्हणजेच प्रतिक्विंटल २५ रुपये वाढ आहे. नवीन हंगामाची बिले आता किमान प्रतिटन २५५० रुपये दराने निघतील; मात्र खोत गटाकडून एफआरपीवर प्रतिटन अजून ३०० रुपये जादा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com