जळगाव : भाजपातून आउटगोइंग सुरू झाले, त्यांचे दुकान वर्षभरात बंद होईल, नाना पटोले यांनी त्याची सुरुवात केली आहे. कर्जमाफी योजना फसवी, तिचे नाव फोकनाड पंतप्रधान कर्जमाफी योजना करा. २० ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे, या दिवशीं मोठा मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी येथे दिला. सुकाणू समितीतर्फे आयोजित शेतकरी परिषदेचे आज (ता. २६) येथे आयोजन करण्यात आले. यावेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते. या परिषदेस खासदार राजू शेट्ठी, आमदार बच्चू कडू, डॉ. अजित नवले, डॉ. बाबा आढाव, कॉ किशोर ढमाले, प्रतिभा शिंदे, अशोक ढवळे, सुशीला मोराळे, जळगाव मविप्रचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
अजित नवले म्हणाले :
कॉ किशोर ढमाले म्हणाले : कर्जमाफी फसवी, फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे, भांडवलदारांची सरकारला अधिक काळजी आहे. सुशीला मोराळे म्हणाले : ज्यांना परिवार नाही, ते काय कुणाची काळजी करतील अशोक ढवळे : ४२ टाक्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या, ३०२ चा गुन्हा सरकारवर दाखल करा
रघुनाथदादा पाटील :
बाबा आढाव :
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.