जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळी पिकांचे पेरणी केली जाते. यंदा मात्र उन्हाळी पिकांचे पेरणी क्षेत्र कमी झाल्याचे जाणकार सांगत आहेत. उन्हाळी मका, भुईमुग, बाजरी, भात, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद आदी पिकांचे सरासरी ८४०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत ३६८२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्यात मक्याचे ७९२, मुगाचे १९, भुईमुगाचे २८७१ हेक्टर क्षेत्र आहे.
भात, बाजरी, सूर्यफूल, तीळ, उडदाची पेरणी झालेली नाही. शेवगाव, पाथर्डी व संगमनेर तालुक्यांत उन्हाळी पिकांची अजून पेरणी झालेली नाही, तर नेवासा, अकोले, राहाता या तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्ती पेरणी झाली आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.
तालुकानिहाय पेरणी कंसात सरासरी क्षेत्र (हेक्टर) ः
नगर ः ९० (३००), पारनेर ः ६० (६००), श्रीगोंदा ः ५१० (१५८०), कर्जत ः ४० (६३०), जामखेड ः ३९७ (८२०), शेवगाव ः ० (५१०), पाथर्डी ः ० (५२०), संगमनेर ः ० (५२०), नेवासा ः ११८७ (१०१०), राहुरी ः ३२४ (६००), अकोले ः ३३८ (३००), कोपरगाव ः २८३ (४८०), श्रीरामपूर ः १६० (३१०), राहाता ः २९३ (२२०).