अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी : खोत

फवारणी प्रकरण
फवारणी प्रकरण

मुंबई : यवतमाळमधील शेतकरी विषबाधा प्रकरणात सतर्कता दाखवण्यात कृषी विभाग अपयशी ठरला अाहे. यामुळे कृषीसह, ग्रामविकास, आरोग्य आणि महसूल विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून निलंबनाची कारवाई करावी, अशी शिफारस कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

कीटकनाशके फवारणी करताना झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूप्रकरणी राज्यमंत्री (कृषी) यांनी ४ ऑक्टोबरला यवतमाळ दौरा केला होता. त्यानंतर याबाबतचा अहवाल त्यांनी राज्य सरकारकडे सादर केला आहे. अहवालामध्ये कृषी विभागावर मुख्य जबाबदारी निश्चित केली आहे.

ग्रामविकास, आरोग्य, महसूल विभागही यामध्ये दोषी असल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. बीटी कापूस बियाण्याच्या वाणिज्यिक मान्यता देण्याचा परवानगीचा पुनर्विचार करण्याची मागणीही अहवालात करण्यात आली आहे. कृषी ग्राम समितीची स्थापना, लेबल क्लेब नसलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीवर कडक कारवाईची शिफारसही केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com