थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक

थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक

बुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची विक्री केली. त्याचे थकलेले पैसे शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक दिली. या ठिकाणी चुकाऱ्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.  

स्वाभिमानी संघटनेचे राणा चंद्रशेखर चंदन यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दोन दिवसांत चुकारे देण्याची मागणी केली. असे न केल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांनी आपला माल नाफेड केंद्रामार्फत विक्री केला. मात्र वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या मालाचे पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार शासनाकडे पैसे मिळण्यासाठी चकरा मारल्या. मात्र शेतकऱ्यांच्या हातावर अद्यापपर्यंत काही मिळाले नाहीत. 

सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी पेरणीसाठी शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. याच मालाच्या पैशातून अनेकांच्या घरी मुलामुलींचे लग्नकार्य आहे. तथापि पैसाच नसल्यामुळे लग्न थांबले आहेत. त्यामुळे मुलामुलींचे आईवडील विवंचनेत आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून शासनाने ज्या शेतकऱ्यांनी नाफेडमार्फत तूर, हरभरा, उडीद, मूग विक्री केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com