मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार : 'स्वाभिमानी'ची शेतकऱ्यांसाठी मोहिम

मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार : 'स्वाभिमानी'ची मोहीम
मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार : 'स्वाभिमानी'ची मोहीम

पुणे : वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) शेतीमालाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे शेतीमालाचे दर मातीमाेल झाल्याने शेतकरी आर्थिक विंवचनेत असून, आत्महत्यांकडे वळत आहे. शेतकऱ्यांना मानसिक बळ देत आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र दिना(ता. १ मे)पासून ‘मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार...’ अभियान राबविणार अाहे. अभियानाचा प्रारंभ धर्मा पाटील यांच्या गावापासुन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. १२) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची दाेनदिवसीय बैठक बुधवार (ता. ११) आणि गुरुवार (ता. १२)दरम्यान झाली. या बैठकीत झालेल्या विविध निर्णयांची माहिती खा शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी संघटनेचे नविनिर्वाचित अध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेत प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते, माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पाेफळे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील आदी उपस्थित हाेते.

या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी देशातील १३४ शेतकरी संघटनांनी एकत्र येत खासगी विधेयक लाेकसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. कर्जमुक्ती विधेयक २०१८ नावाचे हे शेतकऱ्यांचे खासगी विधेयक असणार असून, या विधेयकाची मांडणी आणि चर्चा व्हावी. यासाठी १ मेच्या ग्रामसभांमध्ये ठराव करण्यात येणार आहे. तर १० मे राेजी देश पातळीवर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. हे निवेदन लाेकसभा आणि राज्यसभेच्या सभापतींच्या नावे असणार आहे.’’

माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते म्हणाले, ‘‘प्रत्येक राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात शेतकरी प्राधान्यक्रमावर असताे. मात्र सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. स्वांतत्र्य मिळाल्यानंतर कृषी, सेवा आणि उद्याेगांची विकासदर अनुक्रमे ५२, ३३ आणि १४ टक्के हाेता. ताे आता २०१८ ला अनुक्रमे १७, ५४ आणि १९ टक्के झाला आहे. यामुळे सरकाचे किती दुर्लक्ष शेती क्षेत्राकडे हाेत आहे. हे स्पष्ट हाेत आहे. या आकडेवारीचा आधार घेत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांच्या खासगी विधेयक तातडीने मंजूर करावे.’’ काॅंग्रेस-भाजपचे उपाेषण म्हणजे साै चुहे खाके... सध्या कॉँग्रेस-भाजपचे उपाेषण म्हणजे ‘साै चुहे खाके बिल्ली चली हज काे’ असा प्रकार आहे. भाजपला संसदेचे कामकाज चालूच द्यायचे नव्हते. याचा मी साक्षीदार आहे. भाजपचे आताचे उपाेषण म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. त्यांनी उपाेषणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी सेवाग्राम आणि पाचनरला जावे, असा टाेला खासदार शेट्टी यांनी दोन्ही पक्षांना लगावला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com