पीकविम्याची रक्कम न दिल्यास रुमणे मोर्चा : स्वाभिमानी

पीकविम्याची रक्कम न दिल्यास रुमणे मोर्चा
पीकविम्याची रक्कम न दिल्यास रुमणे मोर्चा

नगर ः नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने त्याची भरपाई मिळणे गरजेचे आहे. मात्र, २०१७ व २०१८ च्या खरीप फळबाग व पीकविमा मिळाला नाही. सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असून जर तातडीने शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाली नाही तर जिल्हा बॅंकेवर रुमणे मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंकेकडे विमा भरलेला आहे, त्या शेतकऱ्यांना मंजूर झालेली विमा रक्कम बॅंक खात्यावर तातडीने वर्ग केलेली आहे. मात्र, जिल्हा सहकारी बॅंकेकडे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा रक्कम भरलेली आहे, त्यांची मंजूर झालेली विमा रक्कम खात्यावर वर्ग झालेली नाही. राष्ट्रीयीकृत बॅंका व सहकारी बॅंका यांनी ऐकाच विमा कंपनीकडे विमा भरलेला असताना राष्ट्रीयीकृत बॅंकांनी व्यवहार पूर्ण केले, मग सहकारी बॅंकेला काय अडचण आहे? डाळिंब, मोसंबी, संत्रा व पेरू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. जर सहकारी बॅंकांनी आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली नाही तर जिल्हा बॅंकेवर रूमणे मोर्चा काढून आंदोलन करू, असे जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद बाबासाहेब मरकड, बाबासाहेब बुधवंत, दत्ता फुंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com