नुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `स्वाभिमानी`चा इशारा

नुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `स्वाभिमानी`चा इशारा
नुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `स्वाभिमानी`चा इशारा

बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता. २२) संताप मोर्चा काढण्याचा इशारा त्याद्वारे देण्यात आला. 

याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, यंदा मोठा दुष्काळ आहे. कापूस, सोयाबीन, तूर यांसारखी सर्व पिके हातून गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा कसा, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. जनावरांना चारा नाही. प्यायला पाणी नाही. क्षारयुक्त पाण्यामुळे लोकांना किडनीचे आजार जडत आहेत. परिणामी, या भागात अनेकांचा मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने संसार उघड्यावर आले. यामुळे शेतकऱ्यांचा धीर खचला आहे. हे सर्व थांबविण्यासाठी सरकारने तत्काळ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. जनावरांना, शेळ्या-मेंढ्यांना चारा सुविधा उपलब्ध करून द्यावी, किडनीच्या आजाराने मृत्यू झालेल्यांच्या  कुटुंबाला २ लाख रुपयांची आर्थिक मदत द्या, या मागणीसाठी संग्रामपूर तहसील कार्यालयावर संताप मोर्चा काढण्यात येणार आहे.

निवेदनावर `स्वाभिमानी`चे रोशन देशमुख, सुनील अस्वार, विजय ठाकरे, रामेश्वर घाटे, गोकूळ गावंडे, नंदकिशोर बोडखे, विकास देशमुख, भगवान तायडे, कृष्णा धुळे, रमेश राजनकर, दीपक मोरखडे, सुरेश भड, गणेश डाबरे, संजय सपकाळ, ईश्वर वानखडे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com