ऊसदराचा निर्णय होईपर्यंत तोडी बंद ठेवा

साखर हंगाम २०१७-१८
साखर हंगाम २०१७-१८

कोल्हापूर : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसतोडी स्वीकारू नयेत, तसेच कर्नाटकातील संबंधित साखर कारखान्यांनी ऊसतोडी बंद ठेवाव्यात, अन्यथा स्वाभिमानी स्टाइलने ऊस तोड व वाहतूक बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीने दिला. 

यंदाच्या गाळप हंगामाविषयी आघाडीची कागल येथे बैठक झाली. या बैठकीत हा इशारा देण्यात आला. श्री हालसिद्धनाथ शुगर फॅक्‍टरी (निपाणी), तसेच बेडकीहाळ शुगर फॅक्‍टरी या सीमाभागातील साखर कारखान्यांच्या ऊसतोडी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहेत. गेल्या २०१६-१७ मधील हंगामात कारखानदारांनी अंतिम दर ३३०० रुपयांपेक्षा जादा दिला आहे. चालू हंगामाच्या दराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सीमाभागातील कर्नाटकातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊस तोडी सुरू केल्या आहेत. ऊस दराचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडी स्वीकारू नयेत, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रभू भोजे, अविनाश मगदूम, राजेंद्र बागल, तानाजी मगदूम, बाबूराव हळदकर, प्रकाश सुळगावे, तानाजी चौगुले, शिवाजी पाटील, संपत पाटील, दादासाहेब पाटील, शिवाजी कळमकर, मधुकर वारके, साताप्पा पाटील, बाळासाहेब नुल्ले, पांडुरंग चौगुले तसेच राहुल खराडे अादी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com