शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा ः जिल्हाधिकारी

शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा ः जिल्हाधिकारी
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा ः जिल्हाधिकारी

सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे, या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत जे शेतकरी महसूल विभागाकडील नोंदणीकृत खातेदार आहेत. म्हणजेच ज्यांची नावे सातबारा उताऱ्यावर आहेत. अशाच शेतकऱ्यांसाठी ही योजना कार्यन्वित करण्यात आली आहे. तसेच १८ ते ७० वयोगट असणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना २०१५ पासून केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत वयोगट पात्रतेतील सर्व व्यक्ती सहभागी होऊ शकतात. या योजनेतून फक्त अपघाती मृत्यू व अपघातामुळे आलेले अपंगत्व या बाबीस संरक्षण देण्यात आले आहे. अपघातादिवशी विमा धारकाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी व ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे. कोणत्याही राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून विमा कंपनीकडे पाठविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज बॅंकेकडे सादर करावा लागेल. विमाधारकाचे कोणत्याही राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत खाते असणे आवश्‍यक (जनधन योजनेचे खाते नसावे) आहे. या योजनेत विमा संरक्षण १ जून ते ३१ मे या एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल. यासाठी विमाधारकाने आपले ज्या बॅंकेत खाते आहे, त्या बॅंकेत योजना कालावधीत केव्हाही जाऊन आपला विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. विमाधारकाचा रक्कम १२ रुपये विमा हप्ता त्याचे बॅंक खात्यातून परस्पर वजा होईल. तसेच या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com