सांगलीत अठरा गावांतून टॅंकरची मागणी

सांगलीत अठरा गावांतून टॅंकरची मागणी
सांगलीत अठरा गावांतून टॅंकरची मागणी

सांगली ः जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद होत निघाली आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे पाणवठे, विहिरी, कूपनलिका तळाला गेल्या आहेत. तहानलेल्या गावांनी प्रशासनाला टॅंकरने पिण्याचे पाणी पुरवावे, अशी साद घातली आहे. त्यात जत तालुक्‍यातील अठरा गावांतून प्रस्ताव सादर झाले असून आटपाडी, खानापूर तालुक्‍यातून टॅंकरची मागणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

पालकमंत्री सुभाष देशमुख यांना या मागणीविषयीची माहिती देण्यात आली असून, परिस्थितीची शहानिशा करून त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या साऱ्या प्रक्रियेत जिल्हा टॅंकरमुक्त झाल्याची घोषणा अडचणीची ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य शासनाकडून पाठ थोपटून घेण्याच्या प्रयत्नात टॅंकरने पाणीपुरवठ्याला खोडा घातला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टेंभू, ताकारा, म्हैसाळ आणि आरफळ या चार उपसा सिंचन योजनांमध्ये तलाव भरून घेतले तरच जिल्ह्यातील गावे टॅंकरमुक्त होतात, हे वास्तव आहे. जलयुक्त शिवारसारख्या योजनेचे ते यश असल्याचे कितीही ढोल पिटले तरी तो दावा पोकळ असल्याचे समोर आले आहे.

यंदा उपसा सिंचन योजनेतून १०५ गावांतील तलाव भरून घ्यावेत, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. पैकी टेंभू, ताकारी योजनांतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. म्हैसाळ योजनेचा वीजपुरवठा जोडला असला तरी पाण्याची मागणीच नाही, या तांत्रिक कारणास्तव योजना सुरू करण्यात आलेली नाही. त्यातून तलाव भरून घेतले तर बहुतांश गावांतील टॅंकरची मागणी कमी होईल, असे सांगितले जाते. तोवर टॅंकर द्यावेत, अशी मागणी येऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com